Description
आयुष्याच्या तारुण्यात पदार्पण करत असताना शाहजी महाराजांनी नर्मदा ओलांडली व मुघली प्रदेशात आक्रमण केले. पुढची चार दशके त्यांच्या घोड्यांना त्यांनी नर्मदा, तापी, गोदावरी, भीमा, कृष्णा, तुंगभद्रा, पेन्नार व कावेरी या नद्यांचे पाणी पाजले व मराठी राज्याचा केवळ पाया रचला नसून त्याची निर्मितीही केली.
विजयनगरचे राज्य संपुष्टात आल्यानंतर दख्खनवर बहामनीशाहीच्या वारसदार असणाऱ्या निजामशाही, आदिलशाही व कुतुबशाही यांचेच वर्चस्व होते. कर्नाटकमध्ये विजयनगरच्या वारसदार पाळेगार सत्ता होत्या. तर कावेरीपार मदुरा-तंजावरचे नायक अजूनही राज्य करत होते.






Reviews
There are no reviews yet.