Description
आपल्या समाजाच्या इतिहासातील तीन प्रेरणादायक व्यक्तींविषयीचे हे लेखन आपल्या हाती देताना मला एक प्रकारचे समाधान वाटत आहे. हे लेखन केल्यामुळे त्यांच्या ऋणातून मुक्त झालो, अशी भावना माझ्या मनात मुळीच नाही. परंतु त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करू शकलो, याची धन्यता नक्कीच आहे. या तीन व्यक्तींपैकी पहिल्या दोघांविषयी बहुतेकांनी खूप काही ऐकलेले, वाचलेले, लिहिलेले असते. मग माझ्या लेखनात नवीन काय, असा प्रश्न निर्माण होऊ शकतो. यांची चरित्रे संदर्भासह, साधार नोंदवण्याचा प्रयत्न या लेखनात आहे, इतकेच याबाबतीत मी म्हणू शकतो. वीरांगना झलकारीबाईंविषयी महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात माहिती नाही, म्हणून येथे ती जाणीवपूर्वक नोंदविली आहे.
डॉ. आ.ह.साळुंखे






Reviews
There are no reviews yet.