Description
‘बालसंगोपन शिक्षण आणि संस्कार’ हे पुस्तक लिहिताना खालील गोष्टी विचारात घेतल्या आहेत.
१) मुलांचे घडणे किंवा बिघडणे सर्वस्वी आईवडील व समाजावर अवलंबून आहे, नव्हे तेच त्याला जबाबदार असतात.
२) आईवडील बालकांवर गर्भावस्थेपासून ते मुलांच्या वयाच्या बारा-तेरा वर्षांपर्यंतच संस्कार करू शकतात. त्या वयानंतर मुलं आईवडिलांचा सल्ला ऐकण्याऐवजी मित्रांचा सल्ला ऐकणं पसंत करतात.
३) मुलांच्या हुशारीचा आणि जात, धर्म व वंशाचा काहीही संबंध नसतो. तसे असते तर आधुनिक काळात अस्पृश्य जातीत जन्मलेले डॉ. बाबासाहेबांएवढे मोठे व्यक्तिमत्त्व घडले नसते. बाळाला गर्भाशयात असल्यापासून त्याच्या वयाच्या चौदा वर्षापर्यंत जसे बालसंगोपन, संस्कार आणि शिक्षण झाले, त्याप्रमाणे त्या बालकाची जडणघडण झालेली असते.
४) जन्मतः मुलं मातीचा गोळा असतो असे मानले जाते. त्या मातीच्या गोळ्याला आकार देणारा कारागीर किती कौशल्याने त्या कलाकृतीवर संस्कार करतो त्यावर त्या कलाकृतीचं भवितव्य अवलंबून असते, तोच न्याय बालकांच्या जडणघडणीला लागू पडतो.
५) मुलांना खेळ व छंद जोपासण्यासंबंधी आईवडिलांची काय भूमिका घेतात ?
इ. गोष्टी महत्त्वाच्या असतात.
हे व इतर बरेच काही विषय विचारात घेऊन हे पुस्तक लिहिले आहे. मानवाच्या जीवनातील आद्य कर्तव्य म्हणजे बालसंगोपन, शिक्षण आणि संस्कार. त्यामुळे मीसुद्धा या पुस्तकाचे लेखन करताना तेवढाच गांभीर्याने विचार केला आहे.






Reviews
There are no reviews yet.