Description
अशक्य कोटीतील स्वप्न म्हणजे ‘स्वराज्य’ हे छत्रपती शिवाजी महाराजांकरवी जिजाऊंनी वास्तवात आणले. जिजाऊंनी आपल्या कुशल व प्रभावी मार्गदर्शनाने महाराजांच्या जन्मजात अशा सर्व गुणांना योग्य तो आकार देऊन, मार्गदर्शन करून शहाजीराजांचे स्वराज्याचे स्वप्न वास्तवात आणले. या वास्तवाच भान असलेल्या विचारातूनच आज ‘जय जिजाऊ ! जय शिवराय !’ ही घोषणा उदयास आल्याचे दिसते.
शिवराय केवळ पन्नास वर्षेच जगले. पण एवढ्या अल्पावधित जगातील अद्वितीय असे कार्य त्यांनी केली. युगानुयुगे अभिमान वाटावा असे हे कार्य आहे. या पन्नास वर्षांपैकी जवळपास पंचेचाळीस वर्षे त्यांना जिजाऊंचे मार्गदर्शन लाभले. प्रत्येक संकटात जिजाऊंच्या अमूल्य अशा मार्गदर्शनाची व प्रत्यक्ष कृतीची त्यांना मदतच झाली. याचे श्रेय इतरांना लाटता येणार नाही, ते जिजांऊकडेच जाते.






Reviews
There are no reviews yet.