Description
छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केलेले स्वराज्य हे लोककल्याण आणि पर्यावरणीय संतुलनावर आधारलेले एक अद्वितीय आणि प्रगतिशील आदर्श राज्य होते. स्वराज्यरूपी नूतन सृष्टीसाठी राजकीय पाठबळासोबतच सह्याद्रिरूपी पर्यावरणाचेही पाठबळ हवे, हे ओळखून शिवछत्रपतींनी स्वराज्याचे बीजारोपण करताना सह्याद्रिरूपी पर्यावरणाचे अंगीकरण तर केलेच, पण त्यासोबतच येथील जल, वन, भूमी आणि कृषी या घटकांचे संगोपनही केले. दुष्काळ निवारण, त्यासाठीची सिंचनव्यवस्था, गडकिल्ल्यांवरील जलव्यवस्थापन, वनव्यवस्थापन आणि वनसंवर्धन, स्वच्छता, आरोग्य व नैसर्गिक साधनसंपत्तीचे सुयोग्य व्यवस्थापन या सर्व बाबींद्वारे शिवछत्रपतींनी दूरदर्शी पर्यावरणनीतीचा अवलंब केला. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज हे सतराव्या शतकातील पर्यावरणाचे अभ्यासक, जलतज्ज्ञ, भूगोलतज्ज्ञ व आपत्तिव्यवस्थापक ठरतात. आधुनिक काळातील पर्यावरणाच्या शाश्वत विकासाचा मूलमंत्र शिवछत्रपतींच्या पर्यावरणनीतीतून मिळतो.






Reviews
There are no reviews yet.