महाभारतातील स्त्रिया भाग १ / Mahabhartatil Striya Part 1

150.00

या पुस्तकात महाभारतातील काही आगळ्यावेगळ्या स्त्रियांच्या जीवनातील वैशिष्ट्यपूर्ण घटनांचे विवेचन केले आहे. ही त्या स्त्रियांची समग्र चरित्रे नव्हेत. त्यांच्या जीवनातील त्या, त्या घटनांचे हे समग्र मूल्यमापनही नव्हे. त्या घटना मांडताना येथे जे काही भाष्य केले आहे, ते त्या काळातील समाजव्यवस्थेची वा समाजधुरीणांची निंदा करण्यासाठी नव्हे. ज्या समाजाचे आचारविचार अजूनही आपल्या रक्तामांसात ठाण मांडून बसले आहेत, त्या समाजाचे मन समजावून घेण्याचा हा एक प्रयत्न आहे. या प्रयत्नाच्या ओघात तत्कालीन जीवनमूल्यांवर काही टीका झाली असलीच, तर ती स्वतःच्याच समाजावरची आणि म्हणून आत्मपरीक्षणात्मक आहे, असे मानता येईल.

 

Pages: 128

Description

महाभारतातील या इतरही अनेक व्यक्तींची अनेकदा चरित्रे अनेक मार्गानी आपल्यापर्यंत आलेली असतात. त्यावरून आपल्या काही धारणा बनलेल्या असतात. पण अनेकदा मूळ कथेत काही बाबी वेगळ्याच असतात. हे थोडे अधिक स्पष्ट व्हावे, म्हणून मी तुळसीची म्हणजेच वृंदेची कथा’ संक्षेपाने येथे देतो. ही कथा या पुस्तकात घेतलेली नाही. ती महाभारतातूनही घेतलेली नाही. कथा पुनरुक्त करण्याची येथे वेगळी कथा द्यावी, या हेतूने वृंदेची एका पुराणातील कथा येथे देत आहे. वृंदा ही जालंधर नावाच्या असुराची पत्नी होती. तिच्या पातिव्रत्याच्या सामर्थ्यामुळे जालंधर अजिंक्य बनला होता. देव तर त्याचा पाडाव करू इच्छित होते. मग विष्णूने वृंदेला फसवून तिच्या पातिव्रत्याचा भंग केल्यामुळे जालंधर युद्धात मारला गेला. वृंदेला हे कळले तेव्हा तिने आपले मन पतीकडे लावून अग्रीत उडी घेतली. तिच्या चितेपासून ज्या तीन वनस्पती निर्माण झाल्या, त्यांपैकी तुळस विष्णूला प्रिय झाली. जालंधर वगैरे असुर राजे नीतिमान असूनही वैदिकांनी प्रचाराच्या जोरावर त्यांना बदनाम केले आहे. याचे विवेचन स्वतंत्रपणे व विस्ताराने करणे आवश्यक आहे. तरीही येथे या कथेचे समग्र विवेचन करणे हा प्रस्तुत विषय नसल्यामुळे जालंधर चारित्र्यहीन होता असे वादासाठी गृहीत धरून पुढे जाऊया.

Additional information

Weight 0.150 kg
Pages

128

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “महाभारतातील स्त्रिया भाग १ / Mahabhartatil Striya Part 1”