दैत्य बळी व कुंतलदेश महाराष्ट्र/ Daitya Bali Va Kuntal Desh Maharashtra

280.00

प्रस्तुत पुस्तकाचे लेखक हे इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअर आहेत. त्यांनी हरप्पा संस्कृतीविषयी आकलनात्मक संशोधन करण्याच्या उद्देशाने जो अभ्यास केला, त्याची निष्पत्ती म्हणजे हे पुस्तक होय. महाराष्ट्राची जडणघडण प्रामुख्याने देवगिरीच्या यादवांच्या काळात झाली असली, तरी त्याची पायाभरणी सातवाहन काळापासून चालू होती. हरप्पा जन आणि ब्राह्मणी व्यवस्थेने ज्यांना व्रात्य क्षत्रिय म्हणून धिक्कारले तो वृजी गण या दोहोंचे सांस्कृतिक वारसदारच महाराष्ट्राच्या जडणघडणीस कारणीभूत आहेत, हा या लेखनाचा प्रमुख निष्कर्ष आहे.

Pages: 204

Description

मराठ्यांच्या असंख्य कुळांचे वृज्जी गणाशी असणारे नाते सिद्ध करण्यात लेखकाने यश मिळविले आहे. हरप्पा पतनानंतर अडीच हजार वर्ष होऊन देखील हरप्पा व वृज्जी गण यांचा सांस्कृतिक वारसा अखंडपणे व ठळकपणे जपण्यात महाराष्ट्राची कुळे इसवी सन दहाव्या -बाराव्या शतकापर्यंत यशस्वी झाली होती. हरप्पापतन, आर्य-अनार्य संघर्ष, बळीवंश इ. विषयांचे लेखकाने चित्रिकरण केले असून त्यासाठी त्याने कुळचिन्हे (ढींशा) अभ्यासली आहेत. महाराष्ट्राची संस्कृती ही यक्ष-नाग, पिशाच संस्कृती असून मराठीची व्युत्पत्ती संस्कृतमध्ये शोधण्यापेक्षा द्रविड व पैशाची भाषेत शोधली पाहिजे. महाराष्ट्राच्या संस्कृतीची जडणघडण कशी झाली व तिचे मूळ स्वरूप काय होते, याबाबत नवीन दृष्टी देणारे हे संशोधन आहे.

Additional information

Weight 0.230 kg
Pages

204

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “दैत्य बळी व कुंतलदेश महाराष्ट्र/ Daitya Bali Va Kuntal Desh Maharashtra”