Description
भारतीय संस्कृतीचा इतिहास घडत असताना वैदिकांनी येथील बहुजन समाजावर अपार अन्याय केलेच. पण तो इतिहास लिहितानाही प्रत्यक्ष घडलेल्या घटनांचे वस्तुनिष्ठ वर्णन करण्याऐवजी आपल्या लहरीनुसार ब आपल्या हितसंबंधांसाठी आपल्या ‘सख्ख्या’ पूर्वजांना सर्व चांगल्या गोष्टींचे श्रेय द्यायचे आणि वाईट गोष्टींचा ठपका इतरांच्या माथी ठेवायचा अशी चलाखी केली. इतिहास लिहिताना न्याबाला अन्याय आणि अन्यायाला न्याय्य ठरवून टाकण्याची किमया त्यांनी केली. स्वतःच्या अत्यंत दुष्ट पूर्वजांनाही सज्जन महणून आणि बहुजनसमाजातील अत्यंत सत्यवृत्त व सदाचरणी लोकांनाही दुष्ट म्हणून रंगवण्याचे काम त्यांनी केले. खरेतर अशा प्रकारची ‘पापे’ त्यांनी किती केली, त्यांची गणतीच नाही, म्हणूनच त्यांनी सांगितलेल्या इतिहासाकडे संशयाने पाहणे, ही भारताचा इतिहास नीट समजून घेण्यासाठी असलेली अत्यंत महत्त्वाची अशी पूर्व-अट आहे, असे मी मानतो.
ठराविक लोकांनीच डोके वापरायचे, ही ऋग्वेदाच्या पुरुषसूक्ताने घातलेली मर्यादा आमच्या शंभर-दीडशे पिढ्यांचे खच्चीकरण करायला कारणीभूत झाली. इतक्या पिढ्यांतील आमचे मायबाप मूक श्रोते राहिले. शोषकांच्या ‘कर्तबगारी’चे मूक, असहाय प्रेक्षक राहिले. शोषकांनी बोलावे आणि आमच्या मायबापानी ते ऐकावे, तेच खरे मानावे, असे युगानुयुगे घडले. पण आता आम्ही नुसते श्रोते, नुसते प्रेक्षक राहणार नाही. आता आम्हीही बोलू आणि त्यांना ऐकावे लागेल. या कालखंडात आमच्या बहुसंख्य पूर्वजांना वाचताही आले नाही, तर लिहिता कुठून येणार? आता मात्र आम्ही वाचक तर होऊच, पण नुसते बाचक म्हणून थांबणार नाही. आता आम्ही लिहू आणि आम्ही लिहिलेले त्यांना वाचावे लागेल. त्यांनी सांगायचे आणि आम्ही ते जसेच्या तसे खरे मानायचे, हे आता घडणार नाही. आता आम्ही त्यांच्या बोलण्यातील खऱ्याखोट्याची तपासणी करू. इतिहासाचा, बर्तमानाचा अन्वयार्थ लावू. भविष्यासाठीचे निर्णय घेऊ. आमच्या डोळ्यांनी पाहू, आमच्या कानांनी ऐकू. आमच्या बुद्धीने विचार करू. आमच्या पूर्वजांनी इतिहास घडवला होता, पण त्यांना तो लिहिता आला नव्हता. आम्ही आता इतिहास घडवूही आणि लिहूही.
आमच्या शोषकांनी स्वतःच्या हितसंबंधांसाठी सांगितलेले समाजशास्त्र, तत्त्वज्ञान वगैरेंना आम्ही आमचे समाजशास्त्र, तत्त्वज्ञान बगैरे म्हणणार नाही. म्हणूनच त्यांनी सांगितलेल्या खोट्या इतिहासाला आम्ही आता चूड लावीत आहोत. आमच्या मेंदूतील गुलामीची जळमटे आम्ही जाळून टाकीत आहोत. वैदिकांनी आमच्या धडावर पुनःपुन्हा कलम करून चिकटवलेली आणि शेकडो पिढ्या तिथे चिकटून बसलेली आमच्या शोषकांची डोकी चार्वाक, गौतमबुद्ध, म. फुले, छ. शाहू, डॉ. आबेडकर बर्गरनी छाटली आहेत आणि त्यांनी आमच्या घडावर आता आमचीच डोकी पुन्हा प्रस्थापित केली आहेत. आता या पुढचे काम आम्ही करीत आहोत आणि आमच्या पुढच्या पिढ्धाही करतील. या धडपडीत आमचे काही चुकेलही; पण आमच्या चुका दुरुस्त करण्याचे काम पुढच्या पिठ्या नक्कीच करतील!






Reviews
There are no reviews yet.